Subscribe Us

मुघल कालीन नाणी



मोगलकालीन पेढी व्यापार

■ मोगल काळात पेढ्यातून बँकाप्रमाणे व्यवहार होत.

हुंडी म्हणजे पैशाच्या विनिमयाचे रोखे.

■ फिरोज तुघलक दुरच्या क्षेत्रातील सैन्याचे वेतन हुंडीच्या स्वरूपात देत असे.

■ पेढीवाले हुंडी/रोखे अल्पप्रमाणात पैसा घेऊन रोख रक्कम देत.

'तमस्सुक' हे रोखीच्या व्यापाराचे/व्यवहाराचे मुख्य साधन.

■ पेढीवाल्यांना सावकार अथवा महाजन म्हणत.

■ महाजन आणि सावकार व्यापार, व्यवहार व शेतकरी यांना कर्जेदेत.

■ खेड्यातील पेढीव्यवहार सराफ अथवा श्रॉफ करत.

■ पेढीवाली नवीन नाणी जुन्या नाण्याबदल्यात देण्यासाठी १/८ किमत घेत.

■ वस्तुच्या अंतरावर व किंमतीवर हुंडीचा विनिमय दर ठरला जात.

■ लाहोर-सुरत दरम्यानच्या हुंडीवर ६.२५% दर आकारला जात

हुंडी विनिमय दर

हुंडी विनिमय दर

शहर

६.२५%

लाहोर-सुरत

६.२५%

आग्रा-सुरत

०३%

सिरिं

२.५-३%

बुऱ्हाणपुर

०५%

बनरस

०७-०८%

पटणा

1०%

ढाका

०१-१.५%

दौलताबाद

०३%

दख्खन

०३

विजापूर

२२-२४

बसरा

मुघलकालीन हुंडी प्रकार

१) दर्शनी हुंडी - तत्काळ रक्कम प्रदान होई. २) मिती हुंडी - ठराविक दिवशी रक्कम मिळे.

३) शहाजोग हुंडी - हुंडी प्राप्त व्यक्तीचे नाव अंकीत असे, हुंडी प्राप्त व्यक्तीलाच रक्कम मिळे.

४) जोखीम हुंडी - जवळच्या व्यक्तीला (संबंधित व अंतराने) जोखीम हुंडी दिली जात. सामान्य व्यवहार जोखीम हुंडीनेच होत.

■ अकबराने पेढी व्यवहारावर कडक नियंत्रणे लावली. ■ जहाँगीर काळात पेढी व्यवहाराचा विकास झाला.

■ जहाँगिरकालीन सुरतचा प्रसिद्ध पेढीदार बहरजी व्होरा कोरोमंडलचा मल्लय्या तर मलबारचा शेट्टी होता

• बहरजी व्होराकडे ०८ लाख रुपयांची संपत्ती होती. तो बनिया होता.

■ मघल कालीन पेढी व्यवहार करणाऱ्या संस्थांना 'कोठी' म्हणतात. पेढीदार नीळीचा वापर मोठ्या प्रमाणावर करत. औरंगजेब कालीन प्रसिद्ध पेढीमालक 'माणिकचंद' होता

माणिकचंद

■ औरंगज़ेब काळातील पेढीमालक माणिकचंद औरंगजेबद्वारा 'सेठ' पदवी माणिकचंदला प्रदान.

■ सेठ माणिकचंद यांचे वडील पेधिमलक होते.

■ माणिकचंदचे ०६ भाऊ पेढी व्यवहार करत.

■ पुतण्या फतेचंद पेढी व्यवसायात श्रेष्ठ होता.

■ फतेचंद मुर्शिदाबाद पेढीचा मालक होता.

■ फरुखसियरने माणिकचंदला 'जगतसेठ' पदवी.

■ राजस्थानमधील सहसमल, विल्हा, कुमुदचंद व

गोवर्धनदास हे पेंढी व्यावसायिक होते.

■ पेढी व्यावसायिकास बोहरा/सेठजी/सराफ/बनिया/ श्रॉफ / चेट्टी असे म्हणत

■ व्याजाचा दर १ रुपयेला प्रतिमहिना १ टंका होता.

मोगलकालीन नाणी

■ मोगलकालीन सुवर्ण नाण्याला 'मुहर' म्हणतात.

बाबर आणि हुमायून याने 'शारुखी' आणि 'विद्धम ही चांदीची नाणी काढली

बाबर आणि हुमायून काळात आग्रा, दिल्ली, लाहोर व काबूल येथे टकसाळ होत्या.

■ शारुखीच्या एका बाजूस कलिमा व चार प्रथम खलिपांची नावे तर दुसऱ्या बाजुस बादशाहचे नाव, वर्ष व टकसाळ इत्यादी नमुद असे.

■ हुमायूनने पाडलेल्या सुवर्ण नाण्याचे वजन १६ ग्रेन होते.

■ हुमायून काळात तांब्याची नाणी नावाशिवाय प्रचलित होती. हुमायून काळात एकूण ७ टकसाळी होत्या.

■ शेरशाहच्या चांदीच्या नाण्याचे वजन १७८ ग्रेन तर तांब्याच्या नाण्याचे वजन ३३० ग्रेन होते.

■ शेरशाहच्या चांदीच्या नाण्यास 'रुपया' तर तांब्याच्या नाण्यास 'दाम' म्हणत.

■ शेरशाहच्या काळात नाण्यांना चौकोनी स्वरुप प्राप्त झाले.

■ मुगलांच्या सुवर्ण नाण्याला 'मुहर' म्हणतात. मुहर १७० ग्रेन्स वजनाची होती.

■ १ मुहर = ९ रुपये असे मूल्य होते.

■ अबराने मुहरचे वजन १७५ ग्रेन केले, तर जहांगिराने मुहरचे वजन २०४ ग्रेन केले.

अबराने नाणी गोल, चौकोनी अथवा वडीप्रमाणे या तीन प्रकारची बनवली.

■ अकबराने पक्षी चित्र असलेले एक व सीता-राम चित्राचे एक हे नाणे काढले.

● इ.स. १५९० ला अकबराने असीरगडच्या विजयाप्रीत्यर्थ पक्षाचे चित्र असलेले नाणे काढले त्यावर बहिरी ससाणाचे चित्र आहे.

• बदकाचे चित्र असलेले नाणे अकबराने काढले त्याचे वजन १८२ ग्रेन होते त्यास 'इलाही मुहर म्हणतात.

• 'लाही मुहर' आग्रा टाकसाळीत काढण्यात आल्या. # 'सीता-राम' चित्रचे नाणे 'अर्धाम्हर' म्हणून ओळखतात.

■ नाण्यावर टकसाळ आणि बादशाहचे नाव अंकित करणाऱ्या दोन काव्यमय ओळी लिहिण्याची पद्धत

अकबराने प्रारंभ केली. ■ जहाँगिराने राशी चक्र दर्शवणारे नाणे व मेंढीचे चित्र असलेले नाणे काढले.

■ जहाँगिराने काढलेल्या नुरजहाँ चित्र असलेल्या नाण्याचे वजन १६६ ग्रेन्स होते.

■ शाहजहान काळातील नाणी कलात्मक मुल्यविरहीत आहेत.

• चांदीच्या नाण्याबाबत वारसा शेरशाहने सुलतानाकडून व शेरशाहचा वारसा मुघल बादशाहनी चालवला.

■ ब्रिटिशांनी सुद्धा चलन म्हणून चांदीचाच रुपया प्रमाणभूत केला त्याचे वजन १७८ ग्रेन होते.

■ अबुल फजलने २००० तोळ्याच्या वजनाच्या नाण्याचा उल्लेख केला आहे.

■ मुघल बादशाहनी विशेष प्रसंगी २ रु. १० रु,

पर्यंतच्या किमतीच्या नाण्याचा वापर केला

■ औरंगजेबकालीन ५.५० पौंड वजनाचे नाणे जर्मनीत ड्रेस्डेनच्या संग्रहालयात संग्रहित आहे.

■ चांदीच्या लहान नाण्यास 'निसार' म्हणत व त्याचे

वजन ४३ ग्रेन होते.

■ चांदीच्या 'शरी दिहम' चे वजन ४४ ग्रेन होते. इ.स. १५७९ नंतर अकबराने नाण्यावर मुख्य

बाजूला 'अल्ला-हू-अकबर' व मागील बाजूला 'जल्लाजलालहु' हे शब्द कोरले. त्या नाण्यास 'इलाही' नाणी म्हणत.

मुघल बादशाहपैकी जहाँगिराने पाडलेली नाणी सर्वात आकर्षक व कलात्मक होती.

■ जहाँगिरीच्या चांदीच्या नाण्याचे वजन २०९-२२० ग्रेन होते.

■ जहाँगिराने इ.स. १६१८ पासून नाण्यावर महिन्याच्या नावाऐवजी 'राशीचक्र' नोंदवले.

■ जहाँगिराने नाण्यावर १२ राशींची नावे नोंदवली.

शाहजहानच्या रुपयाचे वजन १६८ ग्रेन होते.

बाबर-हुमायूंच्या काळात दिल्ली, आग्रा, जौनपूर आणि लाहोर टांकसाळीत तांब्याची नाणी काढण्यात आली.

■ अकबराने तांब्याच्या नाण्यासाठी शेरशाहच्या 'दाम' ला आधारभूत मानले.

■ शेरशाहच्या 'दाम' चे वजन ३२०-३३० ग्रेन होते.

■ शेरशाहच्या काळात १६ आणे बरोबर १ रुपया हे मुल्य होते.

■ अकबराच्या दाम नाण्याला (तांबे नाणी) 'फुलूस' अथवा 'सिक्का फुलुस' म्हणत.

■ अकबराच्या १/२ दामाला 'निस्फी', १/४ दामला- 'दमडा', १/८ दामला 'दमडी' म्हणत.

शेरशाहचे तांब्याचे टंका हे नाणे ६४४ ग्रेन वजनाचे होते.

■ शेरशाह कालीन टंका दिल्ली-अहमदाबादच्या टकसाळीत पाडल्या जात.

■ इ.स. १५९९ ला अकबराने ६४० ग्रेन वजनाच्या तांब्याच्या टंका दिल्ली टकसाळीत काढल्या

■ टंका आणि फुलुस ही तांब्याची नाणी एकाच वेळी चलनात होती.

■ जहाँगिराने फुलुस व टंकांना 'रबानी' (कायदेशीर चलन) म्हटले.

■फुलुस या तांब्याचे प्रमाणभूत वजन (३२०-३३० ग्रेन) ऐवजी औरंगजेबाने ते २२० ग्रेन केले.

■ अकबराने प्रारंभ केलेल्या फुलुसवर अकबराचे नाव नव्हते, तर जहाँगिराने फुलुसवर बादशाह नाव (स्वः) व हिजरी सन अंकित केले.

■ मुघल बादशाहच्या काळात चांदीच्या 'रुपयाचे' मुल्य (प्रमाणभूत वजन व शुद्धता) कटाक्षाने पाळली. गेल्याने आधुनिक काळातही भारतात रुपया हेच चलन राहिले.

- विपुल प्रमाणात चलनात नाणे आणण्याचा प्रारंभ शेरशाहने केला.

काढली. त्यापैकी ३९ टकसाळीत चांदीची नाणी पाडली जात तर ५९ टकसाळीत तांब्याचीही नाणी पाडली जात तर दिल्ली, आग्रा-लाहौर-अहमदाबाद या टकसाळी निरंतर चाल असत.

■ लिलाव पद्धतीने फरुखसियर बादशाहने टकसाळी चालवण्यास दिल्या.

■ अकबराने इ.स. १५५७ ला शाही टकसाळ प्रमुख म्हणून ख्वाजा अबुल समदला नेमले.

■ अकबराने राजा तोडरमलला बंगाल टकसाळ प्रमुख म्हणून नेमले

■ अकबराने २६ प्रकारची नाणी काढली.

■ अकबराने काढलेले 'शंशाह' या नाण्याचे वजन १० तोळे होते.

■ गोल मुहर (वर्तुळाकार) त्यास इलाही तर चौकोनीस जलाली म्हणत.

Post a Comment

0 Comments