Subscribe Us

वर्ग.7.विज्ञान.आपत्ती व्यवस्थापन



प्रश्न 1 - आमच्यातील वेगळे कोण आहे.

(1) दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात

उत्तर - रेल्वे अपघात

(2) अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी.

उत्तर - त्सुनामी

(3) शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड.

उत्तर - टोळधाड

(4) पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे

उत्तर: ज्वालामुखी

प्रश्न 2 - सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय !

(1) दुष्काळ

उत्तर (1) राज्यातील तसेच आपापल्या भागातील विविध प्रकारे वाया जाणाऱ्या पाण्याचा एकत्रित विचार करण्यासाठी शासनाने राज्य, विभाग व जिल्हापातळीवर आणि लोकांनी आपापल्या स्तरावर समिती गठित करून ठोस


नियोजन केल्यास सध्याचा पाणी प्रश्न सहज सुटू शकतो. (ii) पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचा पुनर्वापर करणे. (iii) मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे, तसेच वृक्षतोड थांबवणे. (iv)हवामानांतील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे.

(2) वीज पडणे

उत्तर - (i) मैदानात, झाडाखाली उभे राहू नये, तसेच उंच ठिकाणी, झाडाबर चढू नये. (ii) विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टाँवर इत्यादींजवळ उभे राहू नये." (iii) गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नये. (iv) दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जाणे. (v) एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नये. (vi) दोन व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्यावी. (vii) प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नये. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नये. (viii) पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवावा. (ix) दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसावे. (x) पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडावे. (xi) पक्के घर सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. घरावर तडित रक्षक बसवून घ्यावे.

(3) वादळे

उत्तर - (i) इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी झाडे नियमित छाटावी त्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल) (ii) आपण घराबाहेर असल्यास नेमके कोठे आहोत ते जवळपासच्या नातलगांना, मित्रांना कळवावे. (iii) तुम्ही स्वतः बाहेर असलात, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावे. (iv) गॅस रेग्युलेटरचा स्विच

बंद करावा. बीजपुरवठा खंडित करावा. (v) तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करावे. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना दयावी. (vi) घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय दयावा.

(4) ढगफुटी

उत्तर (i) ढगफुटी अथवा मोठा पाऊस आल्यामुळे दरडी कोसळतात. डोंगर खाली येतो. मोठ्या प्रमाणात दगड-माती खाली येते. तेव्हा डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये. (ii) प्रचंड पावसामुळे नदीला पूर येतो. तेव्हा नदीकाठच्या हॉटेलात, घरात, मंदिरात, लॉजवर न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी अथवा उंचावर थांबावे. (iii) पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड, माती मोठ्या प्रमाणात येते तेव्हा आहे तेथेच थांबून मदतीची वाट पाहावी. वाहन पुढे नेऊ नये. (iv) आपण जिथे थांबलो त्या ठिकाणी रेडिओ, टिव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून असले पाहिजे. त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या सूचना ऐकल्या पाहिजे. (v) प्रचंड प्रलयामुळे रस्ते वाहतूक कोलमडते, वीज जाते, मोबाईल टॉवर उद्ध्वस्त होतात. फोन लागत नाही, अशावेळी धीराने संकटाशी सामना करावा. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उभारलेल्या मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यावा. (vi) अशा आपत्तीच्या काळात लुटालुट होण्याची शक्यता असते. अशावेळी मोठ्या संख्येने एकत्रितपणे व जमावाने राहावे. (vii) औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी मिळण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या संपर्कात राहावे. (viii) आपत्तीप्रवण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लष्कराचे जवान मदत करीत असतात. तेव्हा त्यांना सहकार्य•

करून त्यांची मदत घ्यावी. (ix) आपत्ती काळात अनेक अडचणी येतात. मदत

लवकर पोहचू शकत नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कुणावर दोषारोपण करणे, चुकीचे निष्कर्ष काढणे व अफवा पसरवणे टाळावे.

प्रश्न 3 - सत्य की असत्य ते सकारण सांगा.

(1) वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते.

उत्तर- हे विधान असत्य आहे.

कारण - (i) वादळ ही नैसर्गिक आपत्ती आहे. (ii) वादळाच्या या अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते.) (iii) आपण नैसर्गिक आपत्ती टाळू शकत नाही पण त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो. अत्याधुनिक यंत्रणा वादळापासून वाचण्यासाठी फायदेशीर ठरतात. म्हणून वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची नसते.

(2) आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये.

त्तर- हे विधान सत्य आहे.

कारण - पाणी वीज वहन करते. पाण्यात वीज पडून विजेच्या धक्क्याने दुखापत, इजा किंवा मृत्यूपण ओढवू शकतो! म्हणून आकाशात वीज कडाडत

असताना पाहू नये. (3) ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे.

उत्तर- हे विधान असत्य आहे.

कारण - (i) ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे. (ii) पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे.) भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे तप्त पदार्थांच्या हालचाली सतत होत असतात. त्यामुळे काहीवेळा भूकवचाखालील घन, द्रव आणि वायू पदार्ढर कलले जातात. त्यांना थांबवणे शक्य नाही. (iii) त्याचे भाकीत करणे शक्य आहे. परंतु त्याला नियंत्रित करणे, थांबवणे शक्य नाही. म्हणून ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येत नाही.

(4) अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो.

उत्तर- हे विधान सत्य आहे.

कारण - (i) अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ पडतो. (ii) पुर यां सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते. जमिनीची धूप होते. पिकांचे अमाप नुकसान होते. आजार, रोगराई यांमुळे लोकांचे आरोग्य खालावते. (iii) जनजीवन विस्कळीत होते. उपासमारीची पाळी येते. म्हणून अतिवृष्टीमुळे दष्काळ पडतो.

प्रश्न 4 - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

X (1) त्सुनामी म्हणजे काय ? ती कशी निर्माण होते ?

उत्तर - (i) महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात. त्सुनामी हा जंपानी भाषेतील शब्द आहे. त्सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट होय) (ii) त्सुनामी म्हणजे समुद्रातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय.

त्सुनामीची निर्मिती - जमिनीप्रमाणेच सागराच्या तळाशी भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक होतात. महासागराच्या तळाशी भूकंप झाला तर बाहेर पडणारी ऊर्जा पाण्याला वरच्या दिशेने ढकलते, परिणामी महासागरात विशिष्ट प्रकारच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानाजवळ फार उंच नसतात, परंतु खूप वेगाने त्या

दूरवर पसरू लागतात. तेव्हा या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधी पेक्षा कमी होतो. पण त्यांची उंची खूपच म्हणजे सुमारे 100 फुटापर्यंत वाढलेली दिसते.

(2) ढगफुटी म्हणजे काय?

उत्तर - एका तासात अचानक किमान एक इंच म्हणजे 25 मिलिमीटर पाणी व गारा असल्यास त्यासह एकंदर 100 मिलिमीटर अथवा अ

धिक भरेल असा पाऊस म्हणजे ढगफुगी होय

(3) ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा.

उत्तर - ज्वालामुखीचे परिणाम पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहेत. (i) शिलारस,

बाष्प, उष्ण चिखल, गंधक इत्यादी रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात. त्यामुळे डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. (ii) ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख आणि वायू यांमुळे वातावरण प्रदूषित होते.

(iii) अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊस पडतो. (iv) उष्ण वायूमुळे तापमान वाढते.

(v) उष्ण चिखलाखाली जंगल, वस्त्या गाडल्या जातात.

(4) विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत?

उत्तर - विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी पुढील उपाय आहेत.

(टीप : विद्यार्थ्यांनी या उत्तरासाठी प्रश्न क्र. 2 मधील (2)

चे उत्तर

प्रश्न 5 - महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरडी कोसळणे

पाहावे.)

अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत ?

उत्तर - महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर खालीलप्रमाणे उपाययोजना केलेल्या आहेत.

(i) पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.) या पद्धतीनुसार प्रत्येक विभागांना कामे प्रर नेमून दिलेली असतात. त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय राखला जाऊन तात्काळ दिलासा मिळतो.

(ii) पुराचा धोका असणारी गावे निश्चित करणे, हवामान खात्याशी संपर्क साधून स्थानिक पोलिस पाटबंधारे विभागाच्या साहाय्याने पूर व अतिवृष्टीची माहिती त्वरित उपलब्ध करून त्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे, आपत्ती संबंधी माहितीचे संकलन व वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. (iii) डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे. पाझर तलावाची निर्मिती करणे, नट्यांचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे. नवीन जंगल लागवड करणे. नदया जोडणे इत्यादी. उपाययोजना करता येईल.

प्रश्न 6 - आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल? का?

उत्तर - (i) वीज कडाडत असताना प्लग विद्युत संपर्कातून वेगळा असावा, अन्यथा आग लागण्याची संभाव्यता असते. (ii) मोबाईल बंद करून आहे अथवा नाही हे तपासावे. सुरू मोबाईल मधून विद्युत वहन होते व धोका होतो, (iii) आपल्या इमारतीवर तडितरक्षक आहे का हे माहिती करून घेणे, तडितरक्षक ऊर्जा शोषून घेते. इमारतीवर पडून नुकसान करणारी झाडे नियमितपणे छाटावी व नुकसान टाळावे.

* तोंडी काम

प्रश्न 1 - एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) हवामानातील बदलामुळे कोणकोणत्या निसर्गनिर्मित आपत्ती उद्भवतात ?

उत्तर - हवामानातील बदलामुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, त्सुनामी, वादळे इत्यादी निसर्ग निर्मित आपत्ती उद्भवतात.

(2) दुष्काळ म्हणजे काय ?

उत्तर अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटवड्यामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ,

(3) समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कशाची निर्मिती होते ि

उत्तर - समुद्रातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते.

(1) वीज पडून होणारी जीवितहानी टाळता येते का?

उत्तर- होय. वीज प्रभावित व्यक्तींचा त्वरित इलाज केल्यास त्याचे प्राण वाचवता येतात.

(2) पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे ?

उत्तर - पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून त्याला गोट्याचा थर लावून पक्के करतात

(3) पाणी टंचाई का निर्माण होते ?

उत्तर - पावसाचे पाणी न साठवता वाहून गेल्यास पाणी टंचाई निर्माण होते. (4) आकाशात चमकणारी वीज तुम्ही पाहिली आहे का ? कधी ?

उत्तर होय. पावसाळ्यात आकाशामध्ये चमकणारी वीज ही प्रत्येक पावसाळ्यात पाहिली आहे.

(5) वीज निर्माण कशी होते ?

उत्तर - आकाशात जेव्हा हवा आणि ढग घासले जातात तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित, तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा टप्प्याटप्प्याने ऋणप्रभार जमिनीकडे वाहू लागतो. अतिशय जलद-एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी विद्युतप्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनिऊर्जा निर्माण होते. अशाप्रकारे वीज निर्माण होते.

प्रश्न 2 

 खूप जोराचा पाऊस पडताना डांगराच्या पायथ्याशी का थांबू नये ?

उत्तर - कारण पावसामुळे डोंगरउतारावर दरडी कोसळतात, टेकड्या, डोंगर खचतात आणि खाली येतात व जीवितहानी होण्याची शक्यता असते. म्हणून खूप जोराचा पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये.

प्रश्न

3 - थोडे आठवा.

(1) महापूर म्हणजे काय ? महापुराचे परिणाम कोणते आहेत?

उत्तर - अतिवृष्टिमुळे नदी-नाल्यांतील पाणी वाहून आसपासच्या परिसरात यंत्र

पसरण्याची स्थिती किंवा एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते, त्यास महापूर असे म्हणतात.

महापुराचे परिणाम

(i) मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होते.

(ii) जमिनीची धूप होते.

iii) पिकांचे अमाप नुकसान होते

(iv) पूर ओसरल्यानंतर

ही आजार, रोगराई यांमुळे लोकांचे आरोग्य खालावते.

(2) भूकंप म्हणजे काय ?

उत्तर - भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. - त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. अशी भूकवचामध्ये कंपने होणे यालाच भूकंप म्हणतात.

(3) भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर काय होईल ?

उत्तर - भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे सागराच्या तळाशी झाले तर

त्सुनामीच्या लाटा निर्माण होईल म्हणजेच त्सुनामी येईल. (4) वादळे कशी निर्माण होतात ? त्यांचे कोणकोणते परिणाम होतात ?

(पा.पु.पृ.क्र.69) उत्तर - हवेत निर्माण होणारे कमी-अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात.

वादळाचे परिणाम - (i) वादळग्रस्त प्रदेशांचे अमाप नुकसान होते. (ii) जीवित व मालमत्ता यांची प्रचंड हानी होते. (iii) वीजपुरवठा खंडित होतो. (iv) दळणवळण यंत्रणा खंडित होते.

Post a Comment

0 Comments