2. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी
चंद्राच्या गती
• पृथ्वीप्रमाणेच चंद्रालादेखील अक्षीय व कक्षीय गती आहे.
• चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. तर पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो.
• चंद्राच्या परिभ्रमण व परिवलनाचा कालावधी सारखाच असल्याने चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते.
चंद्राच्या स्थिती
चंद्राची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतांना पृथ्वी व त्याच्यामधील अंतर सर्वत्र सारखे नसते.
• जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, त्या स्थितीस 'उपभू स्थिती' असे म्हणतात.
• जेव्हा पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त दूर असतो, तेव्हा त्या स्थितीस 'अपभू स्थिती' असे म्हणतात.
चंद्राचा टप्पा
• चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत कमीकमी होत जातो.•
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो, तर अमावस्थेला पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो.
शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये ९०० चा कोन होतो, त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो.
ग्रहण
• पृथ्वी व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नसते. त्यांच्यात सुमारे ५० चा कोन असतो.
प्रत्येक परिभ्रमणादरम्यान चंद्र पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो.
प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो १८०० चा असतो.
प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही, म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाही.
• सूर्य, चंद्र व पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात तेव्हा ग्रहणे होतात.
सूर्यग्रहण
• सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत तीनही खगोल समपातळीत व एकाच सरळ रेषेत
असतात. दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेव्हा 'सूर्यग्रहण' होते.
• पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते. सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, त्यास 'खग्रास सूर्यग्रहण' म्हणतात.
जेव्हा विरळ छायेच्या भागातून सूर्यबिंबाचा काही भाग अंशतः ग्रासलेला दिसतो, तेव्हा त्यास 'खंडग्रास सूर्यग्रहण' असे म्हणतात.
चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते. अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते, तेव्हा त्यास 'कंकणाकृती सूर्यग्रहण' असे म्हणतात.
चंद्रग्रहण
• चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, तेव्हा 'चंद्रग्रहण' घडून येते.
• चंद्रग्रहणासाठी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते.
• पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो, तेव्हा त्यास 'खग्रास चंद्रग्रहण' असे म्हणतात.
ज्यावेळी चंद्र काहीसा झाकला जातो, त्यावेळी 'खंडग्रास चंद्रग्रहण' होते
ग्रहण - एक खगोलीय घटना
• सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. य शुभ-अशुभ असे काहीही नसते
• या घटना लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करतात.
• खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण खगोल शास्त्रज्ञांस अभ्यासाची पर्वणीच असते.
ज्या भागात हे ग्रहण दिसणार असेल, तेथे जगभरातील खगोलशास् आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्य करतात.
• सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखा अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात.
प्रश्न १ - चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
उत्तर - हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान - (i) चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रद
घालत असतो. (ii) तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळेचंद्र
सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला, तरी तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो.
(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
उत्तर हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान - पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.
(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे.
उत्तर - हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान - (i) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. (ii) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते.
(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
उत्तर - हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान - चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो.
(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
उत्तर- हे विधान चूक आहे.
दुरुस्त विधान - सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे चुकीचे आहे. कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. म्हणून सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते.
0 Comments