Subscribe Us

शिवजन्म पूर्व भारत.

 इतिहास व नागरिकशास्त्र - वर्ग 7




(२) उदयसिंहाचा पुत्र -

उत्तर - महाराणा प्रताप

(३) मुघल सत्तेचा संस्थापक -

उत्तर - बाबर

(४) बहमनी राज्याचा पहिला सुलतान -

उत्तर - हसन गंगू

(५) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल -

उत्तर - खालसा दल

प्रश्न २ - गटात न बसणारा पर्याय निवडा.

(१) सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर

उत्तर - बाबर

(२) आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरिदशाही

उत्तर - सुलतानशाही

(३) अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब

उत्तर: औरंगजेब

प्रश्न ३ थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली ?

उत्तर - (i) दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले होते. (ii) दौलताबादचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला. हसन गंगू हा या सरदारांचा प्रमुख याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा

पराभव केला. अर्थात दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. म्हणून विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये उदयास आली.

(२) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या ?

उत्तर - महमूद गावानने पुढील सुधारणा केल्या. (ⅰ) महमूद गावानने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले, (ii) त्यांनी सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. (iii) जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. (iv) तसेच बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केले.

(३) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले ?

उत्तर - (i) औरंगजेबाच्या काळात आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष

झाला. मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. (ii) आहोम गदाधरसिंह याच्या नेतृत्वाखाली संघटित झाले. (iii) लाच्छित बडफूकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला. (iv) आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले.

अश्न ४- तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा..

(१) कुष्णदेवराय

उत्तर: (i) कृष्णदेवराय यांचा जन्म इसवी सन 1000 मध्ये झाला. 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आरूढ झाला

(ii) त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. (iii) बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्यांनी पराभव केला. (iv) कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. (v) ते विद्वान होते. त्यांनी तेलुगु भाषेमध्ये 'आमुक्तमाल्यदा' हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. (vi) त्यांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. (vii) कृष्णदेवरायांचा मृत्यू इ.स. १५३० मध्ये झाला. त्यानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली.

(२) चांदबीबी

उत्तर - (i) इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजाम- शाहीच्या राजधानीवर हल्ला करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. (ii) अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांदबिनी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. (iii) त्यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले.

(३) राणी दुर्गावती

उत्तर - (i) चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. (ii) तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. (iii) मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे. (iv) राणी दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही.

प्रश्न ५ - सकारण लिहा.

(१) बहमनी राज्याची पाच शकले झाली.

उत्तर - कारण - (i) महमूद गावाननंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढ लागली. (ii) विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूर परिणाम झाला. (iii) विविध प्रांतांतील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागल्याने बहमनी राज्याचे विघटन झाले. म्हणून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची पाच शकले झाली.

(२) राणासंगा यांच्या सैन्याचा पराभव झाला.

उत्तर - कारण - (i) पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर मेवाडच्या राणासोबत

यांनी राजपूत राजांना एकत्र आणले. (ii) बाबर आणि राणासंगा यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली. (iii) या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे राणासंगा यांच्या सैन्याचा पराभव झाला.

(३) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला.

उत्तर - कारण - (i) राणा उदयसिंहा यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर बसले. (ii) त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला. (iii) महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकव(२) विजयनगरचा पहिला राजा (बुक्का, हरिहर, कृष्णदेवराय) हा होय.

(३) कृष्णदेवरायाने 'आमुक्तमाल्यदा' हा ग्रंथ..... भाषेत लिहिला. (हिंदी, तमिळ, तेलुगु)

(4) ........ हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर आणि सर्वोत्तम प्रशासक होता. (महमूद गवान, मुहम्मद, तुघलक, बाबर)

उत्तर - (1) पाल (2) हरिहर (3) तेलुगू (4) महमूद गव्हाण

(ब) योग्य जोड्या लावा.

'अ' गट

'ब' गट

(१) कुतुबुद्दीन ऐबक

(a) मुख्यमंत्री

(२) हसन गंगू

(ब) मारवाडचा राणा

(३) अकबर

(क) दिल्लीचा सत्ताधीश

(४) जसवंत सिंग

(ड) बहमनी राज्याचा पहिला सुलतान

(इ) मुघल घराण्यातील सर्वांत कर्तबगार राजा

उत्तर – (1 – A), (2 – D), (3 – 3), (4 – B)

'प्रश्न २ - प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत कोणत्या मंदिरांचे बांधकाम झाले ?

उत्तर - कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिरे, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले.ण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. (iv) पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले.(२) विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती ?

उत्तर - विजयनगर या राज्याची राजधानी 'हंपी' होती.

(३) हसन गंगू याने कोठे आपली राजधानी स्थापना केली ?

उत्तर - हसन गंगू याने कर्नाटक राज्यातील 'गुलबर्गा' येथे आपली राजधानी' स्थापना केली.

(४) कोणकोणत्या व्यक्तींनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे ?

उत्तर - महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.

प्रश्न ३ - तुमच्या शब्दांत लिहा.

(१) राजपुतांशी संघर्ष

उत्तर - (i) अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही.

(ii) मारवाडचा राणा जसवंतसिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. (iii) दुर्गादास राठोड याने जसवंतसिंगाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपूत्र अकबराला मारवाडला पाठवले. (iv) परंतु अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. (v) या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष चालू ठेवला.

(४) औरंगजेबाने गुरू गुरुतेघ बहाद्दर यांना कैद केले.

उत्तर - कारण - औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध

शिखांचे मोठे बंड निर्माण झाले आणि त्यातून शीख समुदाय अन्याय विरोधात संघटित झाला



Post a Comment

0 Comments