Subscribe Us

वर्ग 8.इतिहास.स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

 ६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ


प्रश्न १ - (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा

(१) भारत सेवक समाजाची स्थापना ........यांनी केली.

(a) गणेश वासुदेव जोशी

(ब) भाऊ दाजी लाड

( जा. रानडे

(ड) गोपाळ कृष्ण गोखले.

उत्तर - भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे भरविण्यात आले.

(a) पुणे

(ब) मुंबई

(a) कोलकाता

(ड) लखनौ

उत्तर - राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरविण्यात आले.

(३) गीतारहस्य हा ग्रंथ यांनी लिहिला.

(अ) लोकमान्य टिळक

(ब) दादाभाई नौरोजी

(a) लाला लजपत राय

(d) बिपिन चंद्र पाल

उत्तर - गीतारहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. *

(ब) - नावे लिहा.

(९) मवाळ नेते

उत्तर - ना. गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता.

(२) जहाल नेतें

उत्तर - लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र.

प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.

उत्तर- कारण (i) ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. (ii) डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. रा.गो. भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.

(२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.

उत्तर द्या

कारण (i) भारतातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेले सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्रयेत होते. (ii) भारतीय राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर जरी त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्त्विक स्वरूपाचे होते. (iii) स्वातंत्र्यप्राप्त करण्यासाठी शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे हे मवाळ गट व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल गट अशा स्वरूपाचे दोन गट राजकीय चळवळीतील मतभेदांवरून भारतीय राष्ट्रीय सभेत तयार झाले.

(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले

उत्तर - कारण (i) बंगाल हा एक मोठा प्रांत होता. (ii) ब्रिटिशांना या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते. (iii) ही फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले असले तरी लॉर्ड कर्झनचा मुख्य हेतू हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे हा होता. म्हणून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.

प्रश्न ४ - टिपा लिहा.

(१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे

उत्तर - राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे म्हणजे भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही होती.

(२) वंगभंग चळवळ

उत्तर - (i) ऑक्टोबर १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने जनतेच्या विरोधाला प्रतिसाद न देता बंगालच्या फाळणीची योजना अंमलात आणली. (ii). त्यामुळे बंगालमधील जनमत अतिशय प्रक्षुब्ध झाले. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकायचा, स्वदेशी माल खरेदी करायचा म्हणून एकजुटीने संघर्ष करण्यासाठी लोकांनी शपथा घेतल्या.सरकारी शाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून असंख्य विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. (iii) या चळवळीचे पडसाद सर्व भारतभर उमटले. महाराष्ट्र व पंजाबमधील जनतेने विशेष उत्साहाने बंगालला साथ दिली l (iv) वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. (x) बंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली. यामुळे १९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली.

(३) राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री

उत्तर - (i) राष्ट्रीय सभेच्या १९०६ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजीहोते. त्यांनी व्यासपीठावरून 'स्वराज्य' या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. (ii) याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली, (iii) स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ, स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. (iv) परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते.

प्रश्न ४ - भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.

• प्रशासकीय केंद्रीकरण

पाश्चात्य शिक्षण

वृत्तपत्रांचे कार्य

आर्थिक शोषण

उत्तर द्या

- प्रशासकीय केंद्रीकरण - (i) भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचीपार्श्वभूमी पुढील कार्याच्या आधारे स्पष्ट होते. ब्रिटिश प्रशासनाच्या एकछत्री अंमलामुळे देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा मिळाला. त्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. (ii) ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी रेल्वे, रस्त्यांचे जाळे निर्माण केले. याचा फायदा भारतीयांना होऊन अनेक प्रांतातील भारतीयांचा संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली.

आर्थिक शोषण - (i) इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. (ii) शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास सक्ती, शेतसारा व दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा वाकला. पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगाराचे शोषण होत होते. मध्यम वर्गावर नवीन कर लादल्यामुळे लोकांच्या मनात असंतोष वाढत होता.

पाश्चात्त्य शिक्षण - (i) पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. (ii) बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशा मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली.'

भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास - (i) ब्रिटिशांनी स्थापन केलेल्याएशियाटिक सोसायटी'त अनेक भारतीय व पाश्चिमात्त्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. (ii) त्यांनी संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. (iii) आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.□ वृत्तपत्रांचे कार्य - (i) वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. (ii) या वृत्तपत्रांमधून सद्यपरिस्थितीची जाणीव निर्माण होऊ लागली. (iii) दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बझार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली

प्रश्न १ - एका वाक्यात उत्तरे सांगा.

(१) दादाभाई नौरोजींनी १९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणता संदेश दिला ?

उत्तर - 'एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा', असा संदेश दादाभाई नौरोजींनी १९०६ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दिला.

(२) लोकमान्य टिळकांनी माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर कोणत्या शब्दांत टीका केली ?

उत्तर - 'हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशा शब्दांत लोकमान्य टिळकांनी माँटेग्यू - चेम्सफर्ड कायद्यावर टीका केली.

(३) कोणती चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली ?

उत्तर - स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली.

(४) होमरूल म्हणजे काय ?

उत्तर - होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे होय, यालाच 'स्वशासन' असे म्हणतात.

Post a Comment

0 Comments