Subscribe Us

वर्ग.7.इतिहास.मुघलांशी संघर्ष



प्रश्न ३- तुमच्या शब्दांत लिहा.
१) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ( उत्तर- सतत तीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य
साकार झाले होते, तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे, हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे, हे महाराजांच्या लक्षात आले. (ii) यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती. म्हणून त्यांनी ६ जून १६७४ या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला. (iii) या राज्याभिषेका‌द्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून त्यांनी 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. ते आता शककर्ते झाले. (iv) राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा 'होन' व तांब्याची 'शिवराई' ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर 'श्री राजा शिवछत्रपती' अशी अक्षरे कोरण्यात आली.
(२) आम्याहून सुटका
उत्तर - (i) महाराज आम्यास पोहचले तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशाहाने त्यांना नजरकैदेत ठेवले. (ii) बादशाहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. (iii) औरंगजेबाच्या कैदेत असतांना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले. हा आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. (iv) पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत पण पुढेपुढे ते कंटाळले
व पेटारे उघडून पाहिनासे झाले. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी या पेटाऱ्यातून पसार झाले. अशा प्रकारे ते आम्ऱ्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहचले.
(३) शिवाजी महाराजांची दक्षिण मोहिम
उत्तर (1) शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर १६७७ मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतली. (ii) गोवळकोंड्यास त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला. (iii) पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळूरू, होसकोटे, तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला. त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही. (iv) जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते याची नेमणूक केली.) तसेच दक्षिणेच्या मोहीमेत तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णायक महत्त्व आले.
(४) शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी.
उत्तर - शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक करण्याचे ठरविले. त्यांनी राज्याभिषेकासाठी पुढील तयारी केली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान रत्नजडित सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले. त्यावर शुभ छत्र बसवले. (ii) राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीला स्थायिक झालेले गागाभट्ट यांना बोलवण्यात आले. राजेरजवाड्यांना आमंत्रणे गेली. (iii) शिवरायांना सोन्याच्या चौरंगावर बसवले. सात नक्ष्यांच्या आणि समुद्रांच्या पाण्याने भरलेल्या
घागरीच्या धारांनी शिवरायांचा जलाभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी जिजाबाईंचा आशीर्वाद घेतला (iv) गागाभट्टांनी सोन्यामोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व शिवछत्रपतींचा जयजयकार झाला झाला ( अशा तन्हेने ६ जून १६७४ या दिवशी शिवरायांचा राज्यभिषेक झाला.
प्रश्न ४ - कारणे लिहा.
(१) शिवरायांनी पुरंदरचा तह केला.
उत्तर - कारण - (i) जयसिंगाने शिवाजीमहाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याची योजना आखली. (ii) दिलेरखान आणि जयसिंगाने पुरंदरला वेढा घातल्यामुळे प्रचंड मुघल फौजेला तोंड देतांना मराठ्यांची अवस्था बिकट होऊ लागली. (iii) स्वराज्याचा भूप्रदेश या प्रचंड मुघल सैन्याने बेचिराख केला. तरीही शिवाजीमहाराजांनी मुघलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुरंदरच्या वेढ्यात मुरारबाजी देशपांडेला लढताना वीरमरण आले. (iv) मुघलांच्या लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही. आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे, असे महाराजांच्या लक्षात येताच शिवाजीमहाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करण्याचा निर्णय केला. या सर्वं बाबींमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला
(२) शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
उत्तर - कारण - (i) स्वराज्याच्या विविध भागांत मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. (ii) तसेच पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळविण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला.
प्रश्न १ - (अ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(१) रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी केला.
(२) सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून करण्यात आली. ही नवीन कालगणना सुरू
(३) पुण्यातील लाल महालात तळ ठोकून बसला.
(४) जयसिंग आणि दिलेरखान यांनी किल्ल्यास वेढा दिला.
उत्तर – (१) विद्वान पंडित गागाभट्ट (२) राज्याभिषेक शंका
(३) शायिस्ताखान (४) पुरंदर
(ब) योग्य जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) शायिस्ताखान
(अ) मुघल सरदार
(२) मिर्झाराजा जयसिंग
(ब) लाल महालात तळ ठोकला
(३) दाऊदखान
(a) मातब्बर राजपूत सरदार
(ड) पुरंदर किल्ल्यात तळ ठोकला.
उत्तर (1-B), (2-A), (3-A)
प्रश्न २ - एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) रांज्याभिषेक प्रसंगी कोणती खास नाणी पाडण्यात आली ?
उत्तर - राज्याभिषेक प्रसंगी 'श्री राजा शिवछत्रपती' ही अक्षरे कोरलेली 'सोन्याची 'होन' व तांब्याची 'शिवराई' ही खास नाणी पाडण्यात आली.शिवारिका

(२) जयसिंग आणि औरंगजेबादशाह यांनी कोणता विचार केला?
आप महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे, असा विचार जयसिंग आणि औरंगजेब बादशाह यांनी केला.
(३) महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या मोहिमांमध्ये कोणी मोलाची कामगिरी केली ?
उत्तर- महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या चढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, बोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली.
प्रश्न ३- शोधून लिहा.
(१) शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले १
उत्तर - सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमांतून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते. स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून त्यास सर्वमान्यता मिळणे आणि त्याची विधिपूर्वक घोषणा करणे आता आवश्यक होते. म्हणून शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले..
प्रश्न ४- सकारण लिहा.
(१) शिवाजीमहाराजांनी सुरत शहरावर हल्ला करण्याचे ठरवले.
उत्तर - कारण - (i) मुघल फौजांनी स्वराज्याचे मोठे नुकसान केले होते. महाराजांना ते नुकसान भरून काढायचे होते. त्याकरिता महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची योजना आखली. (ii) सुरत त्यावेळी मुघलांच्या ताब्यातील एक मोठे बंदर होते. मुघलांच्या या शहरावर हल्ला करून बादशाहाच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याची शिवाजी महाराजांची योजना होती. (iii) सुरतमध्ये युरोपियनांच्या१
म्हणजे इंग्रज, डच व फ्रेंच यांच्या वखारी होत्या. तसेच हे शहर आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. त्यामुळे शिवाजीमहाराजांनी सुरत शहरावर हल्ला करण्याचे ठरवले.
(१) चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार
उत्तर - फिरंगोजी नरसाळा
(२) सुरतेचा सुभेदार
उत्तर - इनायतखान
(३) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे पंडित
उत्तर - विद्वान पंडित गागाभट्ट
(४) शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू
उत्तर - व्यंकोजी
प्रश्न १ - ओळखा पाहू.
(१) राज्यव्यवहार कोशातील शब्दांचे अर्थ सांगा.
उत्तर: पुस्तक
पदवी
जामीन
सुरक्षा
हाळी
सांप्रत
वकूब
शहाणपण
कदमपोशी -
पायाचा स्पर्श
हँडशेक - हात स्पर्श
फतेह
विजय

Post a Comment

0 Comments