Subscribe Us

वर्ग.7.नागरिक शास्त्र.आपल्या संविधानाची ओळख



आपल्या संविधानाची ओळख

प्रश्न १ - पुढील संकल्पना स्पष्ट करा.

(१) संविधानातील तरतुदी -

उत्तर - (i) देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे संविधानातील तरतुदी होय. (ii) संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. (iii) तसेच संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते.

(२) संविधान दिन -

उत्तर - संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न २ चर्चा करा.

(१) संविधान समितीची स्थापना केली गेली.

उत्तर - (i) भारताच्या संविधान निर्मितीला इ.स. १९४६ पासूनच सुरुवात झाली. (ii) स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समितीच 'संविधान सभा' होय.

(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.

उत्तर - (i) डॉ. बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा

विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. (ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. (iii) संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हणतात.३) देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.

उत्तर - देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उ‌द्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न ४ - तुमचे मत लिहा.

(१) शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात ?

उत्तर - (i) देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. (ii) कायद्याच्या अंमलबजावणी‌द्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. (iii) अर्थात आधुनिक काळातील शासनाला अवकाशे संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. या विषयांवर शासनाला कायदे करावे

लागतात.

(२) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो ?

उत्तर - (i) २६ जानेवारी १९५० पासून संविधानातील तरतुदींनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. (ii) या दिवसापासून भारताचेप्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

३) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. (

उत्तर - संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे

पुढीलप्रमाणे आहेत. (i) शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. (ii) संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. (iii) संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. (iv) संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. (v) संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. (vi) नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते.१ - योग्य पर्याय निवडा.

(१) नागरिकांना त्यांच्या हक्कांची हमी तरतुदीं द्वारे दिली जाते. (संविधातील/नियमावलीतील / कायद्यातील)

(२) संविधानानुसार राज्यकारभार केल्यास (राजेशाही/हुकूमशाही/लोकशाही) बळकट होते.

(३) संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार रोजी केला. (२६ जाने. १९५०/२६ नोव्हेंबर १९४९/२६ जाने. १९३०)

(४) याची सुरुवात भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यापासून झाली. (1946/1942/1949)

(५) संविधान सभेत एकूण (२२०/२९९/३९९) सदस्य होते.

उत्तर - (१) संविधानातील (२) लोकशाही (३) २६ नोव्हेंबर १९४९

(4) I.S. १९४६ (५) २९९

प्रश्न २ - एका शब्दात उत्तरे सांगा.

(१) संविधान म्हणजे काय ?

उत्तर - देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले पायाभूत कायदे, नियम आणि तरतुदी ज्या पुस्तकात एकत्रित आहेत, त्याला संविधान असे म्हणतात.(२) भारताच्या संविधान सभेतील दोन स्त्री सदस्यांची नावे लिहा.

उत्तर - राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख ही भारताच्या संविधान सभेतील दोन स्त्री सदस्यांची नावे आहेत.

(३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान कोणकोणत्या क्षेत्रात होते ?

उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रांत होते.

(४) इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोईसाठी कोणते विभाग पाडले होते ?

उत्तर - इंग्रज सरकाने राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते.

प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे सांगा.

(१) भारताच्या संविधान सभेत किती सदस्य होते ?

उत्तर - 299

(२) संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला ?

उत्तर- २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस

(३) संविधान सभेत सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची निवड झाली होती ?

उत्तर - बी. एन. राव

४) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?.

उत्तर - डॉ. राजेंद्रप्रसाद

(५) संविधानाचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(१) देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो, ते नियम कुठे असतात ?

उत्तर - देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो, ते नियम देशाच्या संविधानात असतात.

(२) ते नियम कोण तयार करते ? त्यांचे पालन बंधनकारक असते का ?

उत्तर - ते नियम संविधान समिती तयार करते. त्यांचे पालन करणे बंधनकारक असते.

प्रश्न २ - चला, शोधू या!

तुम्हांला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाची दोन वैशिष्ट्ये

उत्तर द्या

- देशाचे नाव - अमेरिका

संविधान निर्मितीचे वर्षे - इ. स. १७८९

संविधानाची दोन वैशिष्ट्ये -

(1) संयुक्त राज्य अमेरिकातील संविधानानुसार, हे संविधान संयुक्त राष्ट्राच्याजनतेने तयार केले आहे.

(ii) एक सर्वोच्च न्यायालय असते. त्यातील न्यायाधिशांची निवडणूक सीनेट सदस्याच्या सहमतीने राष्ट्रपती करतो.

(iii) कार्यकारी मंडळाचा प्रमुख राष्ट्रपती असतो आणि राष्ट्रपतीची निवड लोकांकडून होते.

Post a Comment

0 Comments