(१) धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.
उत्तर - (i) भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत. (ii) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना परवानगी दिली नाही. (iii) ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत. थोडक्यात, धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते.
(२) संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय ?
उत्तर उत्तरी- - हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्काबा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. त्याला (संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क असे म्हणतात
२ - योग्य शब्द लिहा.
(१) बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण -
उत्तर - हेबियस कॉर्पस वैयक्तिकरित्या•
(२) कोणत्या अधिकाराने ही कृती केली, असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश -
उत्तर - प्राधिकरण पृष्ठ
(३) लौकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश-
उत्तर - आदेश
(४) कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश
उत्तर - निषिद्ध आदेश/निषेध
प्रश्न ३ - आपण हे करू शकतो, याचे कारण पुढे नमूद करा.
(१) सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. कारण
उत्तर - कारण - (सिण, उत्सव, आहार आणि जीवनपद्धती यांबाबत आपल्या देशात खूप विविधता आहे. (ii) त्यामुळे आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे. म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात. येतात.
(२) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. कारण
उत्तर - कारण - (i) आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे. (ii) त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात. म्हणून मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येतें.
प्रश्न ४ - रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे !
(१) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार विचारात घेते.
(२) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये करता येत नाही. शिक्षण सक्तीचे
उत्तर - (1) न्यायालय (2) धार्मिक
अतिरिक्त प्रश्नोत्तरे
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) भारत हे एक जगातील महत्त्वाचे राष्ट्र आहे.
(२) विचार करताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते.
(३) आपल्या ...... विविध लोकसमूहांना आपापल्या सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे.
उत्तर - (१) धर्मनिरपेक्ष (२) मूलभूत हक्कांचा (३) संविधानाने
प्रश्न २ - पाठात शोधून लिहा.
(१) भारतीय नागरिकांना कोणते धार्मिक स्वातंत्र्य आहे ?
उत्तर - भारतीय नागरिकांना कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क आहेत.
(२) कशाला आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतात ?
उत्तर - संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्याला हक्कांचा वापर करता येत नाही. यालाच आपण आपल्या हक्कांचा भंग झाला असे म्हणतो.
(३) अधिकारपृच्छा म्हणजे काय ?
उत्तर - कोणत्या अधिकाराने ही कृती केली, असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे अधिकारपृच्छा होय.
(४) उत्प्रेक्षण या अधिकाराचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर - कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी आदेश म्हणजे उत्प्रेक्षणाचा अधिकार होय
प्रश्न १ - सांगा पाहू.
(१) हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार विचारात घेते.
उत्तरः न्यायालय
(२) कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश -
उत्तरः प्रकल्पाचा अधिकार
(३) याचा विचार करताना आपल्याला कर्तव्यांचेही भान ठेवावे लागते.
उत्तर - मूलभूत हक्क
प्रश्न १ - शोधा आणि चर्चा करा.
(१) संविधानाने किती भाषांना मान्यता दिली आहे ?
उत्तर - संविधानाने २२ भाषांना मान्यता दिली आहे.
(२) मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या संस्था निर्माण केल्या आहेत ?
उत्तर - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढील संस्था निर्माण केल्या आहेत.
(i) मराठी भाषा अभ्यास परिषद
(ii) राज्य मराठी विकास संस्था
(iii) मराठी
विश्वकोश निर्मिती संस्था (
iv) भाषा संचालनालय
(v) मराठी साहित्य महामंडळ
(vi) विदर्भ साहित्य संघ
(vii) महाराष्ट्र साहित्य परिषद
प्रश्न २ चला, चर्चा करूया.
(१) महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे तुम्हांला वाटते का ? त्यासाठी काय करावे लागेल ?
उत्तर - महाराष्ट्रात सरकारचे व न्यायालयाचे सर्व कामकाज मराठीतून केले जावे असे मला वाटते. त्यासाठी संविधानात ही तरतूद केली जावी अशी मागणी शासनाकडे करेल.
प्रश्न ३- सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रीया योग्य की अयोग्य ?
निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला, "तू निराधार दिसत नाहीस', असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची ही कृती योग्य की अयोग्य ?
वरील प्रसंगात महिलेचा हक्कभंग झाला आहे असे तुम्हांला वाटते का ? तिला दाद मागायची असेल तर तिने कोठे जावे ?
उत्तर - या महिलेचा लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची ही कृती अयोग्य आहे.
0 Comments