विद्यार्थ्यांनी चित्रासाठी पा.पु.पृ.क्र. ५० पाहावे.
अन्न पदार्थांचे गट कोणते ? चित्रांतील अन्नपदार्थांची नावे सांगा. त्यांच्यापासून कोणते मुख्य अन्नघटक मिळतात ?
उत्तर - अन्न पदार्थांचे गट पुढीलप्रमाणे आहेत - 1- (ⅰ) भाज्या (ii) फळे (iii) धान्न
व कडधान्ये (iv) अंडी, मासे, मांस इ. (v) दुध व दुधापासून तयार होणारे पदार्थ चित्रामध्येही भाज्या, फळे, दुध, मासे, तेल, डाळी, धान्य इ. अन्नपदार्थ दिसत आहे
या पदार्थांपासून आपल्याला कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पद व खनिजे मिळतात.
जरा डोके चालवा.
तुमच्या आवडीप्रमाणे एका दिवसाचा संतुलित आहार तुम्ही निवडाः
उत्तर - वरण, भात, एक पालेभाजी (मेथी), मटकीची उसळ, दही, पोळी व केळ.
थोडे आठवा.
(१) आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाहीत, तर काय त्रास होऊ शक
उत्तर - आहारातून पुरेशा प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळाले नाही तर पोटसाफ ह नाही व पचनक्रिया बिघडेल. पुरेशी जीवनसत्त्वांच्या अभावामुळे अनेक आजार बळावतात.सामान्य विज्ञान इयत्ता सहावी
(२) आपल्या अन्नातून तंतुमय पदार्थ काढून टाकले जाऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे ?
उत्तर - रोजच्या आहारामध्ये भाज्या, फळे, तृणधान्ये, कडधान्ये, यांचा समावेश काळजीने करावा आणि भाज्यांची साली काढू नये, पीठ चाळून घेऊ नये.
स्वत:चा अभ्यास
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(अ) अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला म्हणतात.
(आ) शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना म्हणतात.
(इ) कर्बोदके व पासून शरीराला मिळते.
(ई) संतुलित आहारात पोषकतत्त्वांचा प्रमाणात
समावेश असतो.
(3) अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वात मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली गरज भासते.
(ऊ) गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने होते.
उत्तर (अ) पोषण (आ) पोषकतत्वे (इ) स्निग्ध पदार्थ, ऊर्जा (ई) सर्व, पुरेशा
(3) कर्बोदकांची (ऊ) अतिपोषण.
प्रश्न २- खनिजे व जीवनसत्तवांच्या तक्त्यामधून ही माहिती शोधून काढा.
(अ) लिंबूवर्गीय फळांमधील पोषकतत्त्वे.
उत्तर जीवनसत्त्व 'C'
(आ) दुधापासून मिळणारी खनिजे/जीवनसत्त्वे.
उत्तर- कॅल्शिअम, फॉस्फरस ही खनिजे व जीवनसत्त्व A, B.
(इ) रातांधळेपणा, स्कीं, मुडदूस, बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे.
उत्तर रातांधळेपणा हा आजार जीवनसत्त्व 'A' च्या अभावामुळे होतो. या
आजारात रोगी कमी उजेडात पाहू शकत नाही. कधी कधी अंधत्व देखील येते.
स्कव्हीं हा आजार जीवनसत्त्व 'C' च्या अभावामुळे होतो. या आजारात हिरड्यामधून रक्त येणे, गलग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे ही लक्षणे दिसतात. मुडदूस - हा आजार जीवनसत्त्व 'D' च्या अभावामुळे होतो. या आजारात हाडे मऊ होणे. त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे ही लक्षणे दिसतात.
बेरीबेरी हा आजार जीवनसत्त्व 'B1' च्या अभावामुळे होतो. या आजारात चेतातंतुचा आजार, स्नायूंचा अशक्तपणा तसेच अकार्यक्षमता ही लक्षणे दिसतात.बालविद्या परीक्षेची गुरुकिल्ली (भाग-२)
(ई) वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ.
उत्तर रातांधळेपणा हा आजार टाळण्यासाठी गाजर, दूध, लोणी, हिरव्या पालेभाज्या, रताळे, पिवळी फळे व भाज्या खाव्यात.
मूडदूस - हा रोग टाळण्यासाठी कोवळ्या उन्हात बसावे, दूध, मासे, अंडी, लोणी हे पदार्थ खावेत.
बेरीबेरी - हा रोग टाळण्यासाठी दूध, मासे, मांस, तृणधान्ये, कवचफळे, डाळी इ. पदार्थ खावेत.
(3) अॅनिमिया होण्याची कारणे.
उत्तर शरीरातील लोहाचे (हिमोग्लोबिन) प्रमाण कमी झाल्यामुळे अॅनिमिया हा रोग होतो.
(ऊ) दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज.
उत्तर- दात व हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस ही खनिजे आवश्यक आहेत.
(ए) A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम.
उत्तर - A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर पुढीलप्रमाणे परिणाम होतो -
(i) डोळे कमजोर होऊन रातांधळेपणा हा रोग होतो. (
ii) झीरोडर्मा हा त्वचेचा रोग होतो.
प्रश्न ३ - योग्य पर्याय निवडा.
(अ) डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात.
(१)
कर्बोदके (२) स्निग्ध पदार्थ (३) प्रथिने
(४) खनिजे
(आ) या पदार्थापणूसन मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते. (१) तृणधान्ये (२) पालेभाज्या (३) पाणी (४) आवळा
(इ) या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
(१) लोह (२) कॅल्शिअम (३) आयोडीन (४) पोटॅशिअम (ई) याचा जंक फूडमध्ये समावेश होतो.
(१) संत्री
(२) दूध
(३) भाकरी
(४) चॉकलेट
उत्तर- (अ) प्रथिने (आ) तृणधान्ये (इ) आयोडीन (ई) चॉकलेट प्रश्न ४ - अन्न पिरॅमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा.
(१) तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा.
(२) तिन्ही दिवसांच्या आहारात विविधता असावी.
उत्तर - दिवस पहिला पोळी, वरण, पालेभाजी (पालक), ताक, तूप, पपई. दिवस दुसरा - भाकरी, कडधान्ये (चने), दही, लोणी, संत्र.
दिवस तिसरा भात, कडधान्य (मटकी), पनीर, केळ, पापड.
उपक्रम
घरातील विविध अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखायची याची माहिती मिळवा व त्या आधारे भेसळ ओळखा.
उत्तर - आजकाल बाजारात उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचश्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. अन्नपदार्थ शुद्ध आहे किंवा त्यात काही भेसळ केलेली आहे हे ओळखण्यासाठी पुढील माहिती उपयोगी ठरेल.
चहापत्ती एका गाळण कागद (Filter Paper) घ्या त्यावर चहा पसरा. त्यावर थोडे पाणी शिंपडा. जर चहामध्ये कोणताही रंग मिसळला असेल तर कागदावर रंगाचा डाग दिसेल यावरून सिद्ध होते की चहामध्ये रंगाची भेसळ केलेली आहे.
लाल मिरची पावडर मिरची पावडरमध्ये बरेचदा विटांचा चुरा मिसळल्या जातो. ही भेसळ ओळखण्यास एक चमचा मिरची पावडर काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात विरघळा पाण्याचा रंग लाल व मातकट झाल्यास आपणास सहज त्यातील भेसळ ओळखता येईल.
मध मधामध्ये बरेचदा पाण्याची भेसळ केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी मधामध्ये कापसाचा बोळा बुडवावा व नंतर त्याला पेटवा त्यात पाणी असेल तर तो पेटणार नाही परंतु मध शुद्ध असेल तर ते लवकर पेट घेईल.
◇ तोंडी प्रश्न
(१) दिवसभरात खाण्यात येणाऱ्या अन्नपदार्थाला एकत्रितपणे काय म्हणाल ?
(२) उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
(३) जीवनसत्त्वाच्या अभावी होणाऱ्या रोगांचा शोध कोणी घेतला ?
४) कोणत्या जीवनसत्त्वाचा प्रकाश व उष्णता मिळाल्यास नाश होतो ?
(५) कोणते जीवनसत्त्व रक्त साकळण्यास (गोठण्यास) मदत करते ?
उत्तर- (१) आहार (२) किलोकॅलरी (३) 'कॅसिमीर फंक' या वैज्ञानिकाने (४) जीवनसत्त्व 'C' चा (५) जीवनसत्त्व 'क'.
(प्रत्येकी १ गुण)
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांपासून आपली थोड्या प्रमाणात भागते.
(२) शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थांची गरज असते. त्यांना... म्हणतात.
(३) दुधाचे दही करणाऱ्या सूक्ष्मजीवांना म्हणतात.
उत्तर (१) ऊर्जेची (२) खनिजे (३) प्रोबायॉटिक.
बालविद्या परीक्षेची गुरुकिल्ली (भाग-२)
प्रश्न २ सांगा मी कोणाशी जोडी लावू ? '
अ' गट
'ब' गट
(प्रत्येकी १ गुण)
(1) वक्र
(अ) जीवनसत्त्व A
(२) अॅनिमिया
(Aa) जीवन पदार्थ C
(३) मुद्दस
(इ) जीवनसत्त्व B9
(४) रातांधळेपणा
उत्तर द्या
(इ) जीवनसत्व डी
(1) आणि (2) 3 (3) आणि (4) अ.
(प्रत्येकी १ गुण)
प्रश्न ३ - खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
(१) जीवनसत्त्व B व C पाण्यात विरघळतात.
(२) खनिजे व जीवनसत्त्वे यांची शरीराला जास्त प्रमाणात आवश्यक असते.
(४) सर्वच वयाच्या व्यक्तींची ऊर्जेची गरज समान असते.
(३) शरीरात पाण्याचे संतुलन राखण्याचे कार्य सोडियम व पोटॅशिअम ही खनिजे करतात.
उत्तर - (१) बरोबर (२) चूक (३) बरोबर (४) चूक.
प्रश्न ४ - नावे लिहा. (प्रत्येकी २ स्त्रोतांची नावे लिहा.)
(प्रत्येकी २ गुण)
(१) जीवनसत्त्व A
गाजर, दूध
(२) जीवनसत्त्व B12
मांस, दुग्धजन्य पदार्थ
(३) जीवनसत्त्व C
आवळा, लिंबूवर्गीय फळे
(४) जीवनसत्त्व D
मासे, अंडी
(५) जीवनसत्त्व E
तृणांकुर, कोवळी पालवी
५ - काय होईल ते सांगा.
(प्रत्येकी २ गुण)
(१) शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाले तर -
उत्तर - अॅनिमिया (पांडुरोग) होईल त्यामुळे रोग्यास सतत थकवा जाणवेल.
(आ) संतुलित आहार घेतला नाही तर -
उत्तर - व्यक्तीस जीवनसत्त्व तसेच खनिजांच्या अभावी वेगवेगळे आजार होतील. शरीराच्या कार्यक्षमतेवर वा वाढीवर परिणाम होईल.
पश्न ६ असे का म्हणतात ? (कारणे दया.) (प्रत्येकी २ गुण) (१) वाढत्या वयातील मुला-मुलींना २०००-२५०० किलोकॅलरी ऊर्जेची गरज असते.
उत्तर - वाढत्या वयातील मुला-मुलींची शारीरिक वाढ नीट होण्यासाठी जास्त ऊर्जेची रज असते. म्हणून या वयातील मुला-मुलींना २०००-२५०० किलोकॅलरी ऊर्जेची गरज असते.
(२) प्रथिने ही आहाराचे मूलभूत अंग आहे.
उत्तर - प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहेत तसेच शरीराची होणारी
एज भरून काढण्यासाठी व जीवनक्रियांसाठी प्रथिनांची आवश्यकता असते म्हणून प्रथिने आहाराचे मूलभूत अंग आहे.
प्रश्न ७ - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
(प्रत्येकी ३ गुण)
(१) ताक, दही असे दूधापासून तयार होणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात का करावा ?
उत्तर - (i) दही व ताक या पदार्थांमध्ये 'प्रोबायॉटिक' नावाचे सूक्ष्मजीव असतात. (ii) हे सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या आतड्यांमध्ये राहतात व ते आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. म्हणून ताक, दही या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा.
(२) संतुलित आहार घेण्याचे फायदे कोणते ?
उत्तर - संतुलित आहार घेण्याचे फायदे पुढीलप्रमाणे - (१) काम करण्याची क्षमता
वाढते. (२) शरीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. (३) आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. (४) शरीराची चांगली वाढ होते.
0 Comments