Subscribe Us

वर्ग.7.मराठी.थोरांची ओळख.


६. थोरांची ओळख - डॉ. खानखोजे

प्रश्न १ - खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
(१) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.
सत्य
(२) भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं.
खोटे
(३) लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.
सत्य
(४) भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.
सत्य
 प्रश्न ३ - कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
(१) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी (जपान/अमेरिका/मेक्सिको) येथे प्राप्त केली.
(२) या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. (फिजिक्स/जेनेटिक्स/मॅथमॅटिक्स)
(३) भाऊंनी या विषयात डॉक्टरेट मिळवली. (वनस्पतिशास्त्र / प्राणिशास्त्र / कृषिशास्त्र)
उत्तर – (१) अमेरिका (२) अनुवंशशास्त्र (३) शेती
प्रश्न ४ - मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा.
उत्तर - मक्याचे पदार्थ खालील प्रमाणे-
(१) मक्याची भाकर (२) मक्याची उसळ (३) मक्याचे वडे (४) मक्याची खीर
प्रश्न १ * थोरांची ओळख डॉ. खानखोजे' या पाठाचे प्रकटवाचन करा.
उत्तर- विद्यार्थ्यांनी या पाठाचे न अडखळता स्पष्ट उच्चारात वाचन करावे.
शोध घेऊया
प्रश्न १ - दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा.
उत्तर-
बाबा आमटे
बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे होय. यांना थोर समाजसुधारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात ओळखले जाते. त्यांनी कृष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी चालविलेले कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अ‌द्वितीय आहे. यांचा जन्म हिंगणघाट जि. वर्धा येथे २६ डिसेंबर १९१४ रोजी झाला.
बाबा आमटे यांनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांच्या सेवाकार्याला वाहून घेतले. त्यांना या कार्यात त्यांची पत्नी साधनाताई यांनी मोलाची साथ दिली. त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा या गावाजवळ 'आनंदवन' या नावाची एक वसाहत स्थापन केली. या वसाहतीत महारोग्यांच्यापुनर्वसनाच्या कामास सुरूवात झाली. त्यांनी येथे कुष्ठरोग्यांवर फक्त उपचार न करता त्यांना आत्मनिर्भर बनविले. त्यांच्या संस्थेच्या शेतामध्ये सर्व प्रकारची कामे हे कुष्ठरोगी करतात. त्या शेतामधून अन्नधान्य, भाजीपाला, फळे यांचे उत्पादन काढले जाते. शेतीच्या जोडीनेच इतर काही हस्तव्यवसायही तेथे चालविले जात आहेत. बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली
तसेच बाबा आमटे हे राष्ट्रीय एकात्मतेचे क‌ट्टर पुरस्कर्ते होते. भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने त्यांनी इ. स. १९८५-८६ मध्ये शंभर दिवसांचे 'भारत जोडो' अभियान पार पाडले. नर्मदा नदीवर धरण बांधण्याच्या सरकारच्या योजनेमुळे गरीब आदिवासी जनता व हजारो सामान्य शेतकऱ्यांना विस्थापित होण्याचा धोका होता. त्यांची पुनर्वसनाची जबाबदारीही संबंधित राज्यांनी घेतली नाही. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेघा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली 'नर्मदा बचाव' आंदोलन उभारले. बाबा आमटे यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ प्राप्त झाले.
बाबा आमटे यांनी ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी, माती जागवील त्याला मत यांसारखी पुस्तके लिहिली. त्यांना १९८५ मध्ये 'रॅमन मॅगसेसे' पारितोषिक मिळाले. इ.स. १९८६ मध्ये भारत सरकारने 'प‌द्मविभूषण' हा किताब दिला. तसेच पहिला जे.डी बिर्ला पुरस्कार, मानवी हक्क पुरस्कार, टेंपल्टन पुरस्कार, १९९१ च्या राईट लाइव्हलीहूड अॅवॉर्ड, १९९९ मध्ये महात्मा गांधी शांतता पुरस्कार यांचे ते मानकरी ठरले.त्यांना १९ नोव्हेंबर २००२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून 'डी लिट' सन्माननीय पदवी मिळाली. असे हे महान व्यक्तिमत्त्व ९ फेब्रुवारी २००८ मध्ये अनंतात विलिन झाले.
तुम्ही काय कराल ?
प्रश्न १ - तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.
उत्तर - आम्ही गडावरील बाटल्या व कचरा जेवढा शक्य असेल तेवढा उचलून जागा स्वच्छ करू. शिवाय 'या परिसरात कचरा केल्यास दंड केला जाईल' अशा मोठ्या अक्षरातील पाट्या ठिकठिकाणी लावू.
प्रश्न २- खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषणे लिहा. (ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप)
(१) माझ्या डोळ्यातून आसवे गळू लागली.
(२) मी आईच्या गळ्यात पडून रडलो.
(३) रात्र होताच सगळ्यांचे डोळे मिटू लागतात.
(४) पक्ष्याने आपले पंख फडफडवले.
उत्तर - (१) टपटप (२) ढसाढसा (३) आपोआप (४) सावकाश

Post a Comment

0 Comments