३. ब्रिटिश सत्तेचे परिणाम
प्रश्न १ - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) पोर्तुगीज, ..., फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.
(a) ऑस्ट्रियन
(ब) डच
(a) जर्मन
(d) स्वीडिश
उत्तर - पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या
सत्तास्पर्धेत उतरले.
(२) १८०२ मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(अ) थोरले बाजीराव
(b) सवाई माधवराव
(क) पेशवे नानासाहेब
(ड) दुसरा बाजीराव
उत्तर - १८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.(३) जमशेदजी टाटा यांनी • येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
(a) मुंबई
(b) कोलकाता
(a) जमशेदपूर
(d) दिल्ली
उत्तर - जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.
प्रश्न २ - पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) मुलकी नोकरशाही
उत्तर ((i) इंग्रजांना भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज असल्याने लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. (ii) इंग्रजी शासनाचा मुलकी नोकरशाही हा महत्त्वाचा घटक बनला. (iii) त्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये, असा नियम घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. (iv) लॉर्ड कॉर्नवालिसने प्रशासनाच्या सोईसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. (v) जिल्हा शासनाचा प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांची महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी असे. या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (आय.सी.एस) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
(२) शेतीचे व्यापारीकरण
उत्तर - (i) शेतकरी पूर्वी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असून हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. (ii) त्यानंतर इंग्रज सरकार कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन देऊ लागले. (iii) अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारीव्यापारी पिके घेण्याबर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
(३) इंग्रजांची आर्थिक धोरणे.
उत्तर - (i) भारतावर प्राचीन काळापासून आक्रमणे होत राहिल्याने तेथे अनेक आक्रमक स्थायिक झाले. (ii) त्यांनी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल न करता तेथील संस्कृतीशी समरस झाले. (iii) परंतु इंग्रजांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले. (iv) इंग्लंडमध्ये झालेल्या औदयोगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. (v) त्यांनी भारतात या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था रुजवल्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले
प्रश्न ३ - पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
उत्तर - कारण (i) इंग्रजांनी भारतात महसूल गोळा करण्याच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. (ii) त्यांनी शेतकऱ्यांना शेतसारा रोख रकमेत व ठराविक वेळेत भरावा अशी सक्ती केली. हा शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. (iii) शेतकरी शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागले. (iv) व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. (v) प्रसंगी शेतकऱ्यांना शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.
(२) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
उत्तर- कारण - (i) इंग्रज सरकार भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावरजबरदस्त कर आकारत असे. याउलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. (ii) इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असल्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात होई. (iii) अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. त्यामुळे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.
प्रश्न ४ - पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा.
व्यक्ती
काम
लॉर्ड कॉर्नवॉलिस
• नोकरशाहीची निर्मिती केली.
लॉर्ड बेंटिक
सतीबंदीचा कायदा केला.
लॉर्ड डलहौसी
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
विल्यम जोन्स
'एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापन
प्रश्न १ - एका शब्दात उत्तरे लिहा.
(१) राजनीतिविषयक 'सभानीती' नावाचा ग्रंथ लिहून छापणारे.
उत्तर - साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह.
(२) बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणणारे.
उत्तर: रॉबर्ट क्लाइव्ह. ,
(३) याच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायद्याची संहिता तयार केली.
उत्तर - लॉर्ड मेकॉले.
0 Comments