Subscribe Us

मेरी मेट्टी ,मेरा देश .09/08/2023 जाव आंदोलनं

 *9 ऑगस्ट 1942.स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनाचा सुवर्ण मध्य*

*ब्रिटिश सरकार विरोधात निर्वाणीचा लढा सुरू केला गेला त्या आंदोलनाचा सुवर्ण पर्वाचा आजचा दिवस.महात्मा गांधी यांच्या कणखर भूमिकेतून जन्म झालेल्या अर्थात ऑगस्ट क्रांती ,चले जाव, छोडे भारत आंदोलनाचा हा दिवस. राष्ट्रीय ,तथा स्थानिक नेतृत्वाला अटक होऊन ही स्वयंस्फूर्तीने आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणपणाने लढणारे सर्व सामान्य स्वातंत्र्य सैनिक.या अग्रनीच्या लढ्यात वऱ्हाड प्रांताचे अत्यंत महत्त्वाचे योगदान या लढ्यात राहिले आहे.ऑगस्ट क्रांती मध्ये लोणी,इत्तमगाव, बनोडा,धवल गिरी चे पुला वरील रण कंदन,खानापूर, यावली,अकोला, पातूर  वाडेगाव ,हिवरखेड,आकोट,खामगाव,बुलडाणा,चिखली,मेहकर,यवतमाळ, दारव्हा पुसद सारख्या 100 पेक्षा जास्त ठिकाणी इंग्रजां विरोधात सुरू झालेला यशस्वी लढा म्हणजे चले जाव आंदोलनं. या लढ्यात कृष्णाबाई रंगारी यांचे विदर्भातील पहिले हौतात्म्य, सिधनाक गोरे तरुणाची प्राण पणाची झुंज,वामनराव वानखेडे यांचे कुशल नेतृत्व,शांताबाई मेवाडे यांचा अभिनव सत्याग्रह ,अकोला कचेरीतील बॉम्ब  स्फोट,भुसावळ मलकापूर ,अकोला अमरावती नागपूर रेल्वे मार्ग उखडून टाकाने ,पोस्ट ऑफिस,सर्व सरकारी कार्यालये तोडणे,चले जाव आंदोलनाला यशस्वी करण्यात महत्त्वाचे ठरलेत. पोलिसांना ना जुमानता तिरंगा झेंडा हाती घेऊ. फिरणारा अब्दुल,किग्स एडवर्ड कॉलेज मधील विद्यार्थी,राष्ट्रीय शाळांतील असंख्य बाल सत्याग्रही या प्रमाणेच हजारो सर्व सामान्य कुटुंबातील स्वातंत्र्य सैनिक प्राणाची पर्वा न करता या लढ्यात उतरले.त्यांचे बलिदान ,त्याग , भारत माते प्रती निष्ठा यामुळेच आपण आज स्वातंत्र्याची सुमधुर फळे चाखत आहोत.या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पावन स्मृतिस विनम्र अभिवादन* 


वऱ्हाड चा स्वातंत्र्य लढा या पुस्तकात वऱ्हाड प्रांतातील 100 पेक्षा जास्त ठिकाणी झालेल्या आंदोलनाचा परिपूर्ण इतिहास आणि 1000  स्वातंत्र्य सैनिक  यांची सविस्तर माहिती दिलेली आहे



संदर्भ वऱ्हाड चा स्वातंत्र्य लढा.


लेखक. डॉ संतोष बनसोड

           डॉ किशोर वानखेडे 

पृष्ठ संख्या.1335

संपर्क 7588565392

Post a Comment

0 Comments