प्लास्टिक मुक्त गाविलगड,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त अभिनव उपक्रम .
भारतीय पुरातत्व विभाग नागपूर,गड किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र शासन,स्वराज्य सेवा प्रतिष्ठान अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13/08/2023 रोजी प्लास्टिक मुक्त गाविलगड हा उपक्रम यशस्वी पणे राबविण्यात आला. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शिवा काळे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.यावेळी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत 15 पेक्षा जास्त बॅग प्लास्टिक आणि तत्सम साहित्य गोळा करून किल्ल्याची स्वच्छता केली गेली.
या मोहिम मध्ये गड किल्ले संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य चे सदस्य श्री अतुल जी गुरू हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्ण वेळ उपस्थित होते.त्यांनी किल्ला कसा पहावा,किल्ल्याची अंगे, चर्या,जंगी,फांजी,तटबंदी,बुरुज, तोफा,किल्ल्यातील पाणी व्यवस्थापन,आदी विषयांवर सर्विस्तर मार्गदर्शन केले. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवा काळे यांनी मोहिमेचे नेतृत्व करताना किल्ल्याच्या विविध अंगांची माहिती दिली.तथा 3 डिसेंबर 1803 पासून सुरू झालेल्या ब्रिटिश मराठा गाविलगड युद्ध संग्रामाची माहिती दिली.किल्लेदार बेनिसिंग चे हौतात्म्य ,सैनिकांचा पराक्रम आणि इतर बाबी आवर्जून विषद केल्या.लोकमत चे उपसंपादक श्री विवेक चांदूरकर यांनी उपस्थितांना किल्ल्यावरील 1803 चा युद्ध प्रसंग आणि त्याचे परिणाम सांगून हा किल्ला जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे हा संदेश दिला.याप्रमाणेच इतिहास संशोधक डॉ किशोर वानखेडे यांनी गाविलगड किल्ल्यावरील औषधी वनस्पती आणि त्यांचे महत्त्व यावर माहिती दिली.युद्ध काळात सैनिकांना होणाऱ्या जखमा, आजारपणात केला जाणारा नैसर्गिक औषधोपचार,यावर सविस्तर मार्गदर्शन करीत किल्ल्यातील औषधी वनस्पती निदर्शनास आणून किल्ला संवर्धन करताना या बाबी कडेही आवर्जून लक्ष दिले गेले पाहिजे असे आवाहन केले.
या मोहिमे मध्ये श्री अतुल गुरू,शिवा काळे,डॉ किशोर वानखेडे,विवेक चांदूरकर,डॉ देशमुख,राहुल भलावी,गोकुळ सोलकर,नरेंद्र मेहरे,रोहन देशमुख,मंगेश केचे,प्रज्वल ठाकरे,हर्षल,ठाकरे,अंकेश बडोले,हर्षल बहादु रे,महादेव सूकाळे,मंगेश वानखेडे,शस्वत देशमुख,अंकुश भाकरे,हर्षल खंडझोडे,नितीन नांदुरकर,प्रवीण तंतरपांडे,सागर अंभोरे,आरती अंभोरे,विजय देंबरे,शुभम शिंदे, युगल ढोरे,प्रशांत चौढरी,अंकुश गायकवाड, श्री बाह दुरे,योगेश राय जाते,श्री गायकवाड,पवण कालमेघ, गायकवाड,धीरज मेतकर,गौरव यावले,तुषार तांबे, बाल मावळे पुर्वा काळे,राजवीर बाहदुरे तथा महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले मावळे या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी पुढे आले आणि सर्वांच्या सहकार्याने मोहीम फत्ते झाली.
या शिलेदार प्रमाणेच पुरातत्व विभागाचे सहाय्यक कर्मचारी श्री.आदित्य राणे यांनी ही मोलाचे सहकार्य केले.सरतेशेवटी किल्ला स्वच्छ करतांना सूकाले सर यांनी जिजाऊ वंदन,नितीन महाराज यांनी शौर्य गीत गाऊन स्फूर्ती निर्माण केली.दिवसभर किल्ल्याची स्वच्छता करून संध्याकाळी 4 वाजता शौर्य कथा,किल्ल्याचे महत्त्व यावर चर्चा करताना महाराष्ट्रातून आलेल्या स्वच्छता दुतांचा अभिप्राय घेण्यात आला.आणि मोहीम यशस्वी करण्यात आली..
डॉ किशोर वानखेडे.
इतिहास संशोधक,लेखक,समुपदेशक
0 Comments